(अनिल गजरे)
भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरविण्यासाठी सुरू केलेल्या `हर घर नळ. . हर घर जल’ योजनेतून जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यात `जलक्रांती’ होत आहे जलशक्ती योजने अंतर्गत एकूण ७०० कोटी जिल्हा साठी मंजूर करण्यात आले आहे . अशी माहिती केंद्रीय पंचायत राज मंत्री तथा खासदार कपिल पाटील यांनी अंबाडी येथे कार्यरत दिली . भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील 196 गाव-पाड्यांमध्ये जल जीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे 381 कोटी रुपये खर्चून नळाने पाणीपुरवठा करण्याच्या योजनांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज अंबाडी येथे भूमिपूजन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या `जल जीवन मिशन’द्वारे केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी 50 टक्के निधीतून ग्रामीण भागातील गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रती व्यक्ती दररोज 55 लिटर पाणी पुरविले जाणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील 196 गाव-पाड्यांमध्ये जल जीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 10 नव्या नळ पाणीपुरवठा योजना व सध्याच्या योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. जल जीवन मिशनच्या माध्यमातून 226 कोटी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे 155 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
या योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर आज केवणीदिवे, कोपर, वडुनवघर, जुनांदुर्खी, कांबे, खोणी, टेंभिवली, अंबाडी, कवाड येथे झालेल्या कार्यक्रमात भूमिपूजन करण्यात आले. एकाच दिवशी तब्बल 206 योजनांचे भूमिपूजन झाल्याने, भिवंडी ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा दूर होणार असून, त्यांना घरातच नळाने पाणी उपलब्ध होईल.

असे
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले , प्रत्येक गावाची 2052 पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन योजना आखण्यात आल्या आहेत. गावांचा विकास शहरासारखा झाला पाहिजे, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. प्रत्येक गावातील नळपाणीपुरवठा योजनांचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहावे.”आणि काम चांगले करून घ्यावे.

केंद्रीय पंचायत राज विभागाने गावांच्या पातळीवर निश्चित केलेल्या नऊ शाश्वत विकासाच्या योजनांवर कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ग्रामस्थांना केले.
या वेळी बाळासाहेबांची शिवसेना आमदार शांताराम मोरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ मनुज जिंदल, भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, शांताराम पाटील,, दशरथ पाटील, माजी सभापती रविना जाधव ,रवी जाधव, कैलास जाधव, किशोर पाटील, भरत पाटील हरिश्चंद्र पाटील, भानुदास पाटील, बळीराम शिंदे. संतोष पाटील. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे भिवंडी पंचायत समिती चे सहायक गट विकास अधिकारी इंद्रजीत काळे. सुधाकर सोनवणे. विजया पाढंरे मँडम.ग्रामसेवक. आणि ग्रामपंचायत सदस्य. ग्रामस्थ .आदीं मोठ्या संख्येने उपस्थिती होते.